ration aaplya dari: रेशन दुकानात जाण्याची आवश्यकता नाही,घरपोच मिळणार रेशन.
Ration aaplya dari
ration aaplya dari: आता रेशन दुकानात जाण्याची आवश्यकता नाही,घरपोच मिळणार रेशन.
बंधू भगिनींनो नमस्कार,आपल्याला माहितीच आहे की,शासनाच्या विविध योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोचाव्या यासाठी शासन आपल्या दारी ही योजना सुरू करण्यात आली आहे."शासन आपल्या दारी" च्या धर्तीवर आता राज्यात "रेशन आपल्या दारी" ration aaplya dari ही योजना सुरू करण्यात येणार आहे.या योजनेची घोषणा अन्न नागरी व ग्राहक संरक्षण मंत्री श्री.रवींद्र चव्हाण यांनी केली आहे.
नक्की काय असणार आहे योजना व त्याचा लाभ कोणाला होऊ शकणार आहे याबाबत ची माहिती आज आपण पाहणार आहोत.
![]() |
Ration Aaplya Dari |
योजनेची वैशिष्ट्ये:
आपल्याला माहितीच आहे की,जे रेशन लाभधारक नागरिक आहेत त्यांना गहू,तांदूळ, डाळी या रेशन दुकानात मिळत असतात.लाभार्थ्यांना त्या दुकानात जाऊन नियमाप्रमाणे रक्कम देऊन घ्यावं लागतं.ration aaplya dari
मात्र आता मंत्रालयीन बैठकीमध्ये हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे की,शासन आपल्या दारी या योजनेच्या धर्तीवर आता रेशन घेण्यासाठी रेशन च्या दुकानात जाण्याची गरज नाही.
ही योजना लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
योजनेची आवश्यकता :
आपण पाहिलं असेल की, रेशन दुकानात मोठ्या रांगा लागत असत,यामधे नागरिकांचा वेळ जात असे.अनेक वेळेला रेशन संपत देखील असत.त्यामुळे अनेकांना रेशन मिळत नसे. Ration
राज्यातील अनेक पात्र लाभार्थी रेशन पासून वंचित राहतात त्यामुळे कोणीही लाभार्थी वंचित राहू नये तसेच ते त्यांना वेळेवर मिळाले पाहिजे असे निर्देश मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले आहेत.
शासनाच्या या निर्णयामुळे आता नागरिकांचा वेळ वाचणार आहे.
👉Pm Kisan हप्ता मिळण्यासाठी या गोष्टी आहे आवश्यक वाचा👈
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
सदर साईट शासनाची अधिकृत वेबसाईट नाही,तरी कोणत्याही अचूक माहितीसाठी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळास भेट द्यावी